अभिलेख स्कॅनिग , Digitised Land Records , आधुनिक मोजणी तंत्रज्ञान , e फेरफार ,यांतुन तयार होत असलेल्या आधुनिक भूमी अभिलेख विभागाची blue print भाषणाच्या माध्यमातून मा.श्री.चंद्रकांत दळवी, तत्कालीन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी e - Maharashtra 2012 या परिषदेत मांडली होती, त्या भाषणाचा व्हिडिओ blog वर उपलब्ध करून देत आहे सदर भाषण काळजीपूर्वक ऐका...आणि आधुनिक भूमी अभिलेख विभाग कसा असेल याबाबत इतरांनाही माहिती व्हावी यासाठी जास्तीत जास्त share करा.
भूमी अभिलेख विभागाचा गौरवशाली ईतिहास सर्वानसमोर यावा तसेच विभागातील कर्मचारी, आधिकारी तसेच सामान्य जनतेला भूमी अभिलेख विभागातील नियमित कामकाजाबाबत उपयुक्त माहिती देण्याकरीता तसेच विविध संदर्भ साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने ह्या Blog ची निर्मिति केलेली आहे.आपल्या काही सुचना असतील तर kipa_81@yahoo.co.in या इमेल आयडी वर ई - मेल करा. आपल्या सूचनांचे स्वागत !
बुधवार, १२ डिसेंबर, २०१८
कसा असेल भविष्यातील भूमी अभिलेख विभाग ?
अभिलेख स्कॅनिग , Digitised Land Records , आधुनिक मोजणी तंत्रज्ञान , e फेरफार ,यांतुन तयार होत असलेल्या आधुनिक भूमी अभिलेख विभागाची blue print भाषणाच्या माध्यमातून मा.श्री.चंद्रकांत दळवी, तत्कालीन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी e - Maharashtra 2012 या परिषदेत मांडली होती, त्या भाषणाचा व्हिडिओ blog वर उपलब्ध करून देत आहे सदर भाषण काळजीपूर्वक ऐका...आणि आधुनिक भूमी अभिलेख विभाग कसा असेल याबाबत इतरांनाही माहिती व्हावी यासाठी जास्तीत जास्त share करा.
रविवार, २८ ऑक्टोबर, २०१८
महाराष्ट्रातील भूमापनाचा ईतिहास -भूमी अभिलेख विभाग , काल, आज आणि उद्या. (भाग 3 )
- महाराष्ट्रातील भूमापनाचा ईतिहास -

ब्रिटिश काळात शंकु साखळीच्या साहाय्याने जमीन मोजतांना ( एक कल्पना चित्र )
ब्रिटिशांनी भारतीय उपखंडाच्या मोजणीचे अचाट काम सुरू केले होते त्याच दरम्यान महाराष्ट्रात सन 1818 मध्ये ब्रिटीशानी मराठयाकडून सत्ता काबीज केली, ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते,म्हणुन उत्पन्न मिळविणेकरीता ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली,या दृष्टीकोनातुन त्यावेळी दक्षिण विभागाचे राजकारणी कमिशन माउन्टस्टूअर्ट एन्डफिंस्टन यांनी रयतवारी पध्दतीचा पाया घातला. ब्रिटीशांच्या कारकिर्दी दुसरी महत्वाची गोष्ट करण्यात आली ती म्हणजे शेत जमिनीची शास्त्रशुध्द पध्दतीने श्री.गुंटर नांवाच्या अधिका-यांने अंमलात आणलेल्या शंकू साखळी ने मोजणी करण्यात आली.म्हणून शंकू साखळीस गुंटर चैन, गुंठा असे म्हणत सदर साखळी 33 फुट लांबीची असून 16 भागात विभागली आहे.त्या प्रत्येक भागाला आणा म्हणत व गुंटर साहेबांच्या नावावरुन पुढे गुंठा प्रचलित झाला. 40 गुंठयाच्या जमिनीच्या क्षेत्रास एक एकर म्हणत.

जमिन महसूल ठरविण्याचा पहिला मान पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून श्री.प्रिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सन 1827 मध्ये मिळविला. सध्या अस्तिवात असलेली जमिन महसूल आकारण्याची पध्दत ब्रिटीश राजवटीत ठरवून दिलेल्या पध्दतीनुसार आहे.
➤ जॉईंट रिपोर्ट सन 1847 :-
![]() |
↑ मूळ Joint Report ची सध्या महाराष्ट्र शासनाकडून प्रकाशित प्रत. |
निव्वळ शेतीच्या आधारे शेतसारा ठरविण्याचा श्री.प्रिंगले या अधिका-याचा प्रयत्न काही प्रमाणात अयशस्वी झाल्याने, श्री. गोल्डस्मिथ हे आय.सी.एस. अधिकारी, कॅप्टन विंगेट इंजिनीअर व ले.डेव्हीडसन या तीन अधिका-यांची समिती त्या वेळच्या सरकारकडून नेमण्यात आली. येणा-या अडचणी व प्रत्यक्ष अनुभव लक्षात घेऊन त्यांनी सन 1847 मध्ये जमाबंदी कामी संयुक्त प्रयत्न होवून " जॉईंट रिपोर्ट " तयार केला. तद्नंतर त्याआधारे जमिनीची प्रत ठरविण्याबाबतचे नियम तयार केले. त्या आधारेच जमिनीची मोजणी करुन संपुर्ण मुंबई प्रांतात (गुजरात पासून बेळगांव पर्यत)जमाबंदीचे काम सुरु करण्यात आले.जमिनीच्या मगदुरानुसार प्रतवारी वर्गीकरण व त्यावर आधारीत जमिन महसूल आकारणीचे काम पुढे चालु ठेवण्यात आले. मुळ मोजणीचे काम मुंबई प्रांतात पुर्ण झाल्याने सर्व्हेक्षण विभाग सन 1901 मध्ये बंद करणेत आला.
मुळ महसूली मोजणी व फेरजमाबंदीचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 1901 मध्ये सर्व्हे खाते बंद करण्यात येवून सन 1904 मध्ये अभिलेख खाते निर्माण करण्यात आले व त्यांचेकडे भूमि अभिलेखांचे परिरक्षण व अद्ययावतीकरणचे काम सोपविण्यात आले.
पुर्वी सर्व्हेक्षणाचा उद्देश फक्त आकारणीच्या दरात सुधारणा करणे एवढाच असलेने भूमि अभिलेखाचे जतन करणेसाठी व ते अद्यावत ठेवणेसाठी भूमि अभिलेख विभागाची स्थापना करण्यात आली. जिल्हा मुख्यालयास जिल्हा निरीक्षक भूमि अभिलेख, कार्यालयांची निर्मीती करण्यात आली.
फेरजमाबंदी :-
सन 1870 ते 1880 चे दरम्यान फेरजमाबंदीचे काम सुरु करण्यात आले. सदरचे काम करतांना पूर्वी मोजणी न केलेल्या परंतु त्यानंतर वहितीखाली आलेल्या जमीनींची मोजणी करुन नव्याने जमाबंदी केली गेली. सन 1880 ते 1930 तत्कालिन मुंबई प्रांतातील 29 जिल्हयांमधील 301 तालुक्यात फेरजमाबंदी करण्यात आली.सन 1956 च्या सुमारास फेरजमाबंदीचे काम सुरू करण्यात आले.
कुळ कायदा,जमीन एकत्रिकरण योजना कायदा,जमीनदारी व वतने खालसा करण्यासंबंधीचे निरनिराळे कायदे अंमलात आल्याने व फेरजमाबंदीमुळे शेतसा-यात सुमारे 11 ते 16 पट वाढ होत असल्याने,जमीन कसणा-यांवर (शेतक-यांवर) कराचा बोजा वाढविणे संयुक्तिक "न " वाटल्याने शासनाने फेरजमाबंदीचे काम दिनांक 01/06/1959 पासून स्थगित ठेवले.
स्वातंत्र्यपूर्व /स्वातंत्र्योत्तर भूमि अभिलेख विभागाच्या कामकाजाबाबत घटनाक्रम :-
सन 1904 :- मुळ महसूली मोजणी व फेरजमाबंदीचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 1901 मध्ये सर्व्हे खाते बंद करण्यात येवून सन 1904 मध्ये अभिलेख खाते निर्माण करण्यात आले व त्यांचेकडे भूमि अभिलेखांचे परिरक्षण व अद्ययावतीकरणचे काम सोपविण्यात आले.
पुर्वी सर्व्हेक्षणाचा उद्देश फक्त आकारणीच्या दरात सुधारणा करणे एवढाच असलेने भूमि अभिलेखाचे जतन करणेसाठी व ते अद्यावत ठेवणेसाठी भूमि अभिलेख विभागाची स्थापना करण्यात आली. जिल्हा मुख्यालयास जिल्हा निरीक्षक भूमि अभिलेख, कार्यालयांची निर्मीती करण्यात आली.
सन 1913 :- सन 1913 मध्ये अधिकार अभिलेखांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पोटहिस्सा मोजणी सुरू करण्यात आली. इनाम गावाच्या मोजणीचे काम हाती घेण्यात आले .
सन 1947 :- मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडणेस प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947, अस्तीत्वात आला. सदर कायद्याच्या अंमल बजावणीसाठी जिल्हा स्तरावर एकत्रिकरण अधिकारी, तालुका स्तरावर सहाय्यक एकत्रिकरण अधिकारी कार्यालयांची सुरुवात करणेत आली.कामकाजाचे सुसूत्रतेबाबतचे नियम सन 1959 मध्ये तयार करण्यात आले.
सन 1956 :- भूमि अभिलेख अद्यावत ठेवण्यासाठी, व नविन पोटहिस्से मोजणीसाठी जिल्हा स्तरावर सर्व्हे तहसीलदार (पोटहिस्सा) कार्यालयांची सुरुवात करणेत आली. या कार्यालयात वर्ग 2 संवर्गातील अधिकारी व वर्ग 3 संवर्गातील पर्यवेक्षीण कर्मचारी व भूकरमापक यांचा समावेश असलेली आस्थापना निर्माण केली.
सन 1960 :- नगर भूमापन क्षेत्रातील अधिकार अभिलेख अद्यावत ठेवण्यासाठी जिल्हा निरीक्षक भूमि अभिलेख (नगर भूमापन) कार्यालय व गावठाणातील मोजणी कामासाठी विशेष जिल्हा निरीक्षक भूमि अभिलेख (गावठाण) या कार्यालयांची सुरुवात करणेत आली.
सन 1964 :- क्षेत्राचे एकर गुंठे याचे हेक्टर आर असे दशमान रुपांतर करणेचा कायदा सन 1956 मध्ये अस्तीत्वात आला. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हा निरीक्षक भूमि अभिलेख (दशमान) कार्यालयाची स्थापना करणेत आली. दशमान पध्दतीत भूमि अभिलेखांचे रुपांतर करणेचे काम महाराष्ट्र राज्याने भारतात सर्वप्रथम हाती घेतले सदरची कार्यवाही सन 1964 ते सन 1972 पर्यंत पुर्ण करणेत आली.
सन 1970 :- विशेष भूसंपादनाचे कामासाठी जिल्हा स्तरावर अप्पर जिल्हा निरीक्षक भूमि अभिलेख भूसंपादन कार्यालयांची निर्मीती करणेत आली. सरदार सरोवर, जायकवाडी प्रकल्प, इत्यादी प्रकल्पामध्ये भूसंपादन मोजणी वरील आस्थापनेकडून करणेत आलेली आहे.
![]() |
सन 1917 सालातील सोलापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागातील आधिकारी व कर्मचारी वर्ग ( छायाचित्र साभार ,नगर भूमापन अधिकारी सोलापूर ) |
तालुका स्तरावर विभागाची पुनर्रचना 1994
राज्यातील भुमि अभिलेख विभागाचे काम जिल्हा पातळीवरून केले जात असे. या विभागाशी संबंधीत कामाकरीता, सर्वसामान्य जनतेस जिल्ह्याच्या ठिकाणी जावुन संपर्क साधावा लागत असे. तसेच तहसिलदार, गटविकास अधिकारी इ. तालुका पातळीवरील शासकीय कार्यालयांना देखील विभागाशी संबंधीत कामाकरीता जिल्ह्याच्या ठिकाणी संपर्क साधावा लागत असे. याबाबीचा विचार करून तसेच राज्यातील एकत्रीकरण योजनेची अंमलबजावणी स्थगित ठेवण्याच्या निर्णयामुळे त्या योजनेशी संबंधीत आस्थापनेला नियमीत स्वरूपाचे अन्य कामकाज उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यामुळे भुमि अभिलेख विभागाची पुनर्रचना शासन निर्णय क्रमांक आस्थापना 1093/प्र.क्र.19/ल-1/मंत्रालय, मुंबई दि. 18 ऑगस्ट 1994 नुसार तालुका स्तरीय विभागाची रचना करणेत आली.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमि अभिलेख(महा.राज्य) पुणे

उपसंचालक भूमि अभिलेख (विभागीय प्रमुख)

अधिक्षक भुमि अभिलेख(जिल्हा स्तरावर)

तालुका निरीक्षक भुमि अभिलेख (तालुका स्तरावर)
अशी रचना करणेत येवुन प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पदसिध्द उपसंचालक भुमि अभिलेख म्हणुन नेमणेत आले आहे. त्यांचेवर जिल्ह्यातील भुमि अभिलेख विभागाचे कामकाजावर थेट नियंत्रण ठेवुन कामकाजामध्ये सुसुत्रता आणण्याची जबाबदारी सोपविणेत आलेली आहे.
त्यानंतर महसुल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण 2010/1128/प्र.क्र.223/ल-1,दिनांक 28 जुन 2010 अन्वये अधीक्षक भूमि अभिलेख व तालुका निरिक्षक भूमि अभिलेख यांचे पदनामात खालील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे.
जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख(जिल्हा स्तरावर)

उपअधीक्षक भुमि अभिलेख (तालुका स्तरावर)
महाराष्ट्रातील भूमापनाचा ईतिहास व त्यातून आता अस्तित्वात आलेल्या भूमी अभिलेख विभागाची माहिती ह्या ब्लॉग मधून मी देण्याचा मी प्रयत्न केलाय. ह्या पुढच्या लेखात भूमापनातील महत्वाच्या अभिलेखांची माहिती देणार आहे.
ब्लॉग बाबत आपले मत अवश्य कळवा.
➤पुढील लेखात :- भूमापनातील महत्वाचे अभिलेख.
मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८
ब्रिटिश काळातील भूमापनाचा ईतिहास -भूमी अभिलेख विभाग , काल, आज आणि उद्या. (भाग 2 )
ब्रिटिश काळातील भूमापनाचा ईतिहास
जेम्स रनेल - भारताचे पहिले सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया ( बंगाल प्रांत )
ब्रिटीश राजवट:-
आज अस्तित्वात असणाऱ्या भूमी अभिलेख विभागाची खऱ्या अर्थाने मुळे रुजली ती ब्रिटिश काळात ,ब्रिटीशांनी सन 1600-1757 पर्यंत भारतीय भुभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. म्हणुन ब्रिटीशांनी उत्पन्न मिळविणेकरीता जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातुन ब्रिटीशांनी सन 1767 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली सदर पदावर सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया म्हणुन जेम्स रनेल यांची नियुक्ती करण्यात आली. जेम्स रनेल लिखीत '"Bengals Atlas" या पुस्तकात शंकु साखळीने जनिनीची मापे आणि खगोल शास्त्रीय माहिती याचा एकत्रित आधार घेऊन नकाशे तयार केले असा उल्लेख आहे.
कर्नल विल्यम लॅम्बटन - भारतीय भूमापनाच्या इतिहासातील मानबिंदु !
भारतीय उपखंडाच्या भूमापनाचे खरे श्रेय जाते ते कर्नल विल्यम लॅम्बटन यांना,
कलकत्ता स्थित ३३ व्या ब्रिटीश रेजिमेंटमध्ये ते सेन्य आधिकारेी म्हणुन दाखल झाले. ही रेजिमेंट सर ऑर्थर वेलस्ली यांच्यानेतृत्वाखाली कार्यरत होती. सन १७९६ मध्ये यांना लेफ्टनंट म्हणून पदोन्नती मिळाली आणि ते कर्नल आर्थ यांच्या नेतृत्वाखालील रेजिमेंटमध्ये सामिल झाले. सन १७९९ मध्ये त्यांनीचौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धांत भाग घेतला. श्रीरंगपट्टणमला युध्दामध्ये त्यांनी संपूर्ण ब्रिगेडचे नेतृत्व केले व त्यावेळी वरिष्ठ अधिकारी यांची पिछेहाट होताच अत्यंतकुशलतेने लष्करातील डावी फळी सांभाळली.कर्नल लॅम्बटन यांच्या सर्वेक्षणातील ज्ञानामुळे जनरल बेअर्ड यांच्या नेतृत्वाखाली म्हैसूरयुध्दामध्ये निघालेल्या युध्द मोहिमेस ता*यांच्या मदतीने योग्य दिशादर्शनकेले.
म्हैसूर काबिज केल्यानंतर वेलस्ली यांच्याकडे भूपृष्ठमिती(Geodesy) या नव्या तंत्राचा उपयोग करून सर्वेक्षण करण्याचा प्रस्तावत्यांनी मांडला. यापूर्वी या सर्वेक्षण तंत्राचा वापर विल्यम रॉय यांनी ब्रिटनसर्वेक्षणावेळी केला. त्यांनी मांडलेला प्रस्ताव मेजर जेम्स रॅनेल यांनी अशाप्रकारचे सर्वेक्षण कर्नल कॉलीन मॅकेन्झी यांनी हाती घेतलेने पुन्हा अशासर्वेक्षणाची आवश्यकता नाही असा शेरा नमूद करून प्रस्ताव नाकारला. रॉबर्ट क्लाईव्ह यांचे नातेवाईक व प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ नेव्हीलमेस्केलीन यांनी कर्नल लॅम्टन यांच्या प्रस्तावाचे पुन:परीक्षण केले व त्याप्रस्तावाचे वैज्ञानिक मूल्य जाणून रॅनेल यांची दिशाभूल झाल्याचे मतव्यक्त केले. त्यामुळे या प्रस्तावास रॅनेल यांचा पाठींबा मिळण्यास मदतझाली आणि सदर सर्वेक्षण प्रस्तावास लॉर्ड क्लाईव्ह यांची मान्यता मिळाली. लॅम्बटन यांनी ब्रिटनहून कोनमापक, दूर्बिण (थिओडोलाईट) मागवली व तीभारतात येण्यासाठी सन १८०१ साल उजाडले. या उपकरणाच्या सहाय्याने लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली.
कलकत्ता स्थित ३३ व्या ब्रिटीश रेजिमेंटमध्ये ते सेन्य आधिकारेी म्हणुन दाखल झाले. ही रेजिमेंट सर ऑर्थर वेलस्ली यांच्यानेतृत्वाखाली कार्यरत होती. सन १७९६ मध्ये यांना लेफ्टनंट म्हणून पदोन्नती मिळाली आणि ते कर्नल आर्थ यांच्या नेतृत्वाखालील रेजिमेंटमध्ये सामिल झाले. सन १७९९ मध्ये त्यांनीचौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धांत भाग घेतला. श्रीरंगपट्टणमला युध्दामध्ये त्यांनी संपूर्ण ब्रिगेडचे नेतृत्व केले व त्यावेळी वरिष्ठ अधिकारी यांची पिछेहाट होताच अत्यंतकुशलतेने लष्करातील डावी फळी सांभाळली.कर्नल लॅम्बटन यांच्या सर्वेक्षणातील ज्ञानामुळे जनरल बेअर्ड यांच्या नेतृत्वाखाली म्हैसूरयुध्दामध्ये निघालेल्या युध्द मोहिमेस ता*यांच्या मदतीने योग्य दिशादर्शनकेले.
म्हैसूर काबिज केल्यानंतर वेलस्ली यांच्याकडे भूपृष्ठमिती(Geodesy) या नव्या तंत्राचा उपयोग करून सर्वेक्षण करण्याचा प्रस्तावत्यांनी मांडला. यापूर्वी या सर्वेक्षण तंत्राचा वापर विल्यम रॉय यांनी ब्रिटनसर्वेक्षणावेळी केला. त्यांनी मांडलेला प्रस्ताव मेजर जेम्स रॅनेल यांनी अशाप्रकारचे सर्वेक्षण कर्नल कॉलीन मॅकेन्झी यांनी हाती घेतलेने पुन्हा अशासर्वेक्षणाची आवश्यकता नाही असा शेरा नमूद करून प्रस्ताव नाकारला. रॉबर्ट क्लाईव्ह यांचे नातेवाईक व प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ नेव्हीलमेस्केलीन यांनी कर्नल लॅम्टन यांच्या प्रस्तावाचे पुन:परीक्षण केले व त्याप्रस्तावाचे वैज्ञानिक मूल्य जाणून रॅनेल यांची दिशाभूल झाल्याचे मतव्यक्त केले. त्यामुळे या प्रस्तावास रॅनेल यांचा पाठींबा मिळण्यास मदतझाली आणि सदर सर्वेक्षण प्रस्तावास लॉर्ड क्लाईव्ह यांची मान्यता मिळाली. लॅम्बटन यांनी ब्रिटनहून कोनमापक, दूर्बिण (थिओडोलाईट) मागवली व तीभारतात येण्यासाठी सन १८०१ साल उजाडले. या उपकरणाच्या सहाय्याने लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली.
![]() |
लॅम्बटन यांनी ब्रिटनहुन मागवलेली थिओडोलाईट |
त्या वेळेचेथिओडोलाईट उपकरण म्हणजे वस्तुत: उभ्या व आडव्या समांतर वर्तुळाकार चकत्यांवरफिरणारी दुर्बिण होय.त्यावेळी संपूर्ण जगामध्ये अशापध्दतीची फक्ता दोन/तीनच उपकरणे उपलब्ध होती. विल्यम रॉययांनी केलेल्या ब्रिटिश सर्वेक्षणावेळी असे उपकरण प्रथमच उपयोगातआणले. या उपकरणाचे उत्पादन विल्यम कॅरी यांनी केले होते. याउपकरणात क्षितिजसमांतर ३६ इंच तर उभ्या १८ इंच व्यासाचीचकत्यांवरील मापे मायक्रोस्कोपच्या सहाय्याने घेतली जात होती. या यंत्राचे वजन सर्वसाधारणपणे ५०० किलो होते, त्यास उचलण्यासाठी १२हून अधिक लोकांची आवश्यक पडत असे. या उपकरणाच्या सहाय्याने लॅम्बटन यांनी मद्रास व बंगळूर आधाररेषेची तुलनात्मक गणना केली असता केवळ अडीच इंचाचा फरक आढळून आला. यावरून या उपकरणाची अचूकता व दर्जा अधोरेखित होतो.

⇦ लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली.
भूमापन कामाकरिता reference पॉईंट तयार करतांना ( एक कल्पनाचित्र) ➡
कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी भारतीय सर्वेक्षण इतिहासातीलसाहसी, महत्वाकांक्षी आणि गणितीयदृष्ट्या किचकट सर्वेक्षणाचीसुरुवात चेन्नईजवळच्या सेंट थॉमस पर्वतापासून केली. सर्वेक्षणाचे कामपूर्ण होण्यासाठी चार दशकांचा प्रदीर्घ कालावधी लागला व हा सर्वेक्षणप्रकल्प हिमालयाच्या पायथ्याशी पूर्ण झाला. कर्नल लॅम्बटन यांनी अत्यंतकाळजीपूर्वक सेंट थॉमस पर्वतापासून दक्षिणेस १२ कि.मी. अंतरावरभारतीय द्विपकल्पाच्या मध्यावर अक्षांश व रेखांश नोंदविण्यासाठीआधाररेषा निश्चित केली. साधारणपणे ७८० रेखांशाच्या व्यामोत्तर(दक्षिणोत्तर) भारतीय उपखंडातील २४०० कि.मी. अंतराचा परिसर "ग्रेटइंडियन आर्क ऑफ द मेरिडीयन" म्हणून ओळखला जातो. या मोहिमेचे फलस्वरूप सन १८४३ मध्येहिमालय पर्वतरांग ही अॅण्डिज पर्वतापेक्षाही उंच असल्याचे सिध्द झालेव जगातील सर्वोच्च शिखर म्हणून माऊंट एव्हरेस्ट या शिखरास मान्यतामिळाली.
➤ सर जॉर्ज एव्हरेस्ट -
.
जॉर्ज एव्हरेस्ट यांच्याच नावावरून जगातील सर्वोच्च उंचीच्या पर्वताला”एव्हरेस्ट पर्वत’ हे नाव देण्यात आले
Index map of Great Trignometric Survey of India

सर्वेक्षणाच्या या महान व जोखीमपूर्ण मोहिमेत समकालीन युध्दांमध्ये बळी गेलेल्या लोकांप्रमाणेच या मोहिमेमध्येही बळी गेले. त्या कालखंडामध्ये संगणकउपलब्ध नसताही अत्यंत जटिल गणितीय समीकरणांचा वापर करूनसर्वेक्षणाचे काम पूर्ण केले.आधुनिक संचार सुविधा, संपर्क यंत्रणा व सर्वेक्षण साधने उपलब्धनसताना देखील मोहिम यशस्वीरित्या पूर्णत्वास नेण्यासाठी कर्नल लॅम्टन यांनी कठोर परीश्रम घेतले व भारतीय उपखंडातील शास्त्रोक्त सर्वेक्षणाचीमुहूर्तमेढ रोवली. आपल्या देशातील वैविध्यपूर्ण हवामान, डोंगररांगा,पर्वतरांगा,गंगा,सिंधू,ब्रह्मपुत्रा यासारख्या नद्या, दलदलीचा प्रदेश, पूर, संसर्गजन्य आजार यावर मात करून GTS मोहिम कर्नल लॅम्टन आणि जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पूर्णझाली, आणि भारतीय उपखं-डाचा नकाशा अस्तित्वात आला.
भारतीय भूमापनाचा हा इतिहास अत्यंत संक्षिप्त स्वरूपात मी या ब्लॉग मध्ये मांडला आहे , खरं तर ती एक खूप मोठी कहाणी आहे , पण ब्लॉगच्या वाचकांच्या माहिती साठी अतिशय कमी शब्दात काही छायाचित्रांच्या साहाय्याने मी तो मांडण्याचा प्रयत्न केलाय.
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
➤ पुढील ब्लॉग मध्ये -
ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्रात कशी झाली जमीन मोजणीला सुरवात ? कसा अस्तित्वात आला आजचा ' महाराष्ट्र राज्याचा भूमी अभिलेख विभाग ' ?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)